आज स्त्री विश्वात झालेली प्रगती लक्षणीय असली, तरी एक काळ असा होता, की स्त्रियांचे स्थान केवळ स्वयंपाकघरातच होते, तरीही त्यावेळच्या परिस्थितीतही स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या स्त्रिया होत्या. अशाच एका स्त्रीची कहाणी नेहा कुलकर्णी यांनी या छोटेखानी कादंबरीतून रेखाटली आहे. हा काळ १९३०-४०चा आहे. बकुळाने त्या काळातील प्रथा मोडून नऊवारी सीडीऐवजी पाचवारी साडी नेसली, सायंकाळ चळवळी, घर जाळायला आलेल्यांच्या समोर बंदूक घेऊन उभी राहिली.
विघ्नेश्वराची कृपा असणारी, अभ्यंकर वाड्यात राहणारी, पत्नी या नात्याने त्र्यंबकच्या जीवनात प्रवेश करणारी, इनामदारांच्या उमावहिनी म्हणून वावरणारी, संकटांना सामोरी जाणारी, पुन्हा नवी सुरुवात करणारी आणि अखेरीस गावाची माईआजी अशी ओळख निर्माण करणारी अशी बकुळाची विविध रूपे या कहाणीत दिसतात.
प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन
पाने : ८०
किंमत : १०० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)